Mumbai..
मुंबई... मुंबई ही फक्त आपल्या देशाची आर्थिक राजधानी नसून ती तरुण पिढीची स्वप्न पूर्ण करणारी एक जादुई नगरी आहे. इथे येणारा प्रत्येक तरुण हा काही ना काही स्वप्ने घेऊन येतो आणि तो ती पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो.असे नाही की सर्वांचीच स्वप्ने पूर्ण होतात काही जणांची होतात तर काही लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करत करत तिथलेच होऊन जातात. अशी ही मायावी नगरी हा आमच्या देश्याचा श्वास आहे. ह्या नगरी बद्दल जेव्हढा बोलावं ना तेवढा कमीच आहे. इथे प्रत्येक भागाला नाव देण्यामागे त्याची स्वतःची एक कहाणी आहे. ह्या नगरीत तुम्हाला वेग वेगळ्या भाषेचा दर्शन नक्कीच होईल कारण इथे भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोक सामावलेले आहेत. लोक म्हणतात कि मुंबई कधीच झोपत नाही होय मुंबई कधीच नाही झोपत कारण इथे सर्व आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या नादात वेळेचे भान विसरून जातो. आजपर्यंत ह्या मुंबई खूप काही पहिला आणि सोसला आहे तरी हि अजून ती तितक्याच मानाने डोलत आहे. तशी मुंबई हि पर्यटन साठी खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यात मुंबईला लाभलेला समुद्र तरी मुंबईची शान अजून वाढवतोय. खर तर मुंबई हि सात बेट...